साखरेच्या निर्यातीवर बंदी लागू…; केंद्र सरकारचा निर्णय 

<p>साखरेच्या निर्यातीवर बंदी लागू…; केंद्र सरकारचा निर्णय </p>

नवी दिल्ली – केंद्र सरकारने 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत साखर निर्यातीवर बंदी लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतला आहे. 

देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमतींवरचा दबाव वाढत आहे. त्यामुळे साखर निर्यातीवर निर्बंध घालून, देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुधारेल आणि किमती नियंत्रणात राहतील.
ही बंदी CXL आणि TRQ कोट्यांतर्गत युरोपियन युनियन (EU) आणि अमेरिकेला (USA) केली जाणारी साखर निर्यात; 'अग्रिम प्राधिकार योजने' अंतर्गत होणारी निर्यात  किंवा इतर राष्ट्रांच्या अन्नसुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने 'सरकार-ते-सरकार' (G-to-G) स्तरावर केली जाणारी निर्यात यांना लागू होणार नाही. तसेच, ज्या साखरेच्या खेपांची निर्यात प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे, त्यांनाही या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.